Skip to main content

परासरण (Osmosis)

      🎯🎯 परासरण (Osmosis)  🎯🎯
         जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण.
  ही भौतिक क्रिया असून ती घडण्याच्या 3 वेगवेगळ्या शक्यता असतात.
अ) समपरासारी (Isotonic) द्रावण :- पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी या दोन्हींतील पाण्याचे प्रमाण सारखे असते. त्यामुळे पाणी आत वा बाहेर जात नाही.
ब) अवपरासारी (Hypotonic) द्रावण :- पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशीत शिरते. याला अंतःपरासण (Endosomis) म्हणतात. उदा. बेदाणे पाण्यात ठेवल्यावर काही वेळाने फुगतात. 
क) अतिपरासारी (Hypertonic) द्रावण :- पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते. उदा. फळांच्या फोडी साखरेच्या घट्ट पाकात टाकल्यास फोडींतील पाणी पाकात जाऊन थोड्या वेळाने त्या आकसतात. 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना

 🎯 महाराष्ट्रातील महामंडळे व त्यांची स्थापना 🎯 💥 महामंडळ 👉 स्थापना वर्ष 👉 मुख्यालय  १) कृष्णा खोरे विकास महामंडळ 👉 १९९६ 👉 पुणे  २) विदर्भ सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 नागपूर  ३) कोकण सिंचन विकास महामंडळ 👉 १९९७ 👉 ठाणे   ४) तापी सिंचन विकास महामंडळ 👉 1997 👉 जळगाव  ५) गोदावरी - मराठवाडा सिंचन विकास महामंडळ 👉१९९८ 👉 औरंगाबाद

लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने

🎯 लॉर्ड डलहौसीने खालसा केलेली संस्थाने   🎯       १) सातारा (१८४८)          २) जैतपूर (१८४९)       ३) संभलपुर (१८४९)        ४) भघाट (१८५०)       ५) उदयपूर (१८५२)          ६) झांशी (१८५३)       ७) नागपूर (१८५४)          ८) करौली (१८५५)       ९) अवध (१८५६)

‘रौलट कायदा

🎯 🎯  ‘रौलट कायदा ’ 🎯🎯      या कायद्याने कोणत्याही भारतीयाला विनाचौकशी अटक करण्याचा, न्यायालयात खटला न भरता तुरुंगात डांबण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला. या कायद्याने दिलेल्या शिक्षेविरुद्ध अपील करण्यास मनाई करण्यात आली.भारतीयांनी या कायद्याला ‘काळा कायदा’ असे संबोधले. या कायद्याविरुद्ध देशभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी या कायद्याविरुद्ध सत्याग्रह पुकारला. ६ एप्रिल १९१९ मध्ये रौलट कायद्याला विरोध करण्यासाठी देशव्यापी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.  या लढ्यात पंजाब प्रांतात प्रखर स्वरूप धारण केले.यामध्ये अमृतसर हे शहर या चळवळीचे प्रमुख केंद्र बनले होते. सरकारने दडपशाहीचे सत्र सुरू केले. येथील हरताळ प्रकरणी डॉ.सत्यपाल व सैफुद्दीन किचलु अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी जनरल डायर लष्करी गाड्या घेऊन निःशस्त्र, निरपराध जनतेवर पूर्वसूचना न देता बेछूट, अमानुष गोळीबार केला गेला.  या हत्याकांडात सुमारे चारशे स्त्री-पुरु...